नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणासह अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गंगापूर धरणातून ८,३७० क्युसेक वेगाने पाणी सोडले जात असून, गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. निफाड तालुक्यातील चांदोरी आणि सायखेड्यात पूरस्थिती निर्माण झाली असून, सुमारे ६५० कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, पूरस्थिती
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies