भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेचा ९० धावांनी पराभव करत मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना इशान किशन (८१) आणि तिलक वर्मा (६०*) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने ५ बाद २१९ धावा केल्या. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा संघ १७.५ षटकांत १२९ धावांत गारद झाला. अभिषेक शर्माने तीन गडी बाद केले. तिसरा सामना रविवारी होणार आहे.
भारताचा झिम्बाब्वेवर ९० धावांनी दणदणीत विजय
Source: Pudhari
Read the live feed on ZapIndies