मुंबईतील कुर्ला एल.बी.एस. मार्ग जंक्शन येथे पावसाळ्यात होणारी पूरपरिस्थिती कमी करण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी साई सिध्दी इन्फ्रास्ट्रक्चर या कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली असून, १३ कोटी १९ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. मिठी नदीला जोडलेल्या पातमुखापर्यंत पाणी वाहून नेण्यासाठी नाल्यांची पुनर्रचना केली जाणार आहे. यामुळे भविष्यात पाणी तुंबण्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.
कुर्ला एलबीएस जंक्शनची पाणी तुंबण्याची समस्या मिटणार
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies