धुळे जिल्ह्यातील पिंपरी परिसरात तापी नदीच्या बॅकवॉटरमुळे २०० एकरांवरील कापूस, सोयाबीन आणि मक्याची पिके पाण्याखाली गेली आहेत. सलग ४८ तासांच्या मुसळधार पावसाने नदीला पूर आला असून हातनूर धरणातून पाणी सोडल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे. पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे आणि मदतीची मागणी केली आहे.
धुळ्यात तापीच्या पुरामुळे पिंपरीत शेकडो एकर पिके पाण्याखाली
Source: Lokshahi Marathi
Read the live feed on ZapIndies