केंद्र सरकारने लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, 2035 पर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक उभारण्याचे लक्ष्य आहे. त्यापूर्वी इस्रोची 'गगनयान' मानव अंतराळ मोहीम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पहिले मानवरहित उड्डाण 2026 च्या चौथ्या तिमाहीत होणार असून, 2027 पर्यंत दोन मानवरहित मोहिमांनंतर पहिली मानवी मोहीम राबवली जाईल. या प्रकल्पांसाठी 20,193 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
2035 पर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक; गगनयान मोहिमेची तयारी अंतिम टप्प्यात
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies