पावसाळ्यात सापांचा वावर वाढतो, त्यामुळे सर्पदंशाच्या घटना घडतात. महाराष्ट्रात नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे हे चार प्रमुख विषारी साप आहेत. दंश झाल्यास शांत राहून तातडीने रुग्णालयात नेणे आवश्यक आहे. घराभोवती कचरा साचू न देणे, उंदरांचा वावर कमी करणे यासारख्या काळजीने बचाव करता येतो.
पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका; महाराष्ट्रातील ४ विषारी सापांची ओळख
Source: Prahaar