महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसानंतर आता बहुतांश भागांत उघडीप मिळाली आहे. मात्र, कोकण आणि पश्चिम घाट परिसरात पावसाचा प्रभाव कायम असून घाटमाथ्यावर दमदार सरी सुरू आहेत. गुरुवारी (ता. ६) आंबोली येथे १३९.५० मिमी आणि महाबळेश्वर येथे १२२ मिमी पावसाची नोंद झाली. धरणांमध्ये पाण्याची आवक कायम असून खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने रायगड, पुणे आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला; घाटमाथ्यावर दमदार सरी
Source: Agrowon