पीएमएफएमई योजनेतील उल्लेखनीय कामगिरीसाठी महाराष्ट्राच्या कृषी विभागाची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे २४ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीत हा पुरस्कार स्वीकारणार आहेत. या योजनेअंतर्गत राज्यात ३१,७४६ प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून, त्यात १७,७८६ महिला उद्योजकांच्या प्रकल्पांचा समावेश आहे.
महाराष्ट्र कृषी विभागाला राष्ट्रीय पुरस्कार
Source: Prahaar