नाशिक जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ अंतर्गत अभिनव भारत मंदिराच्या उर्वरित कामांसाठी २ कोटी ५० लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या निधीतून सावरकरांनी रूढ केलेल्या शब्दांचे भित्तिचित्र उभारण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ही मान्यता दिली असून कामाची अंमलबजावणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होणार आहे.
अभिनव भारत मंदिरासाठी २.५० कोटींची मंजुरी
Source: Prahaar