आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात सहा पिढ्यांचं 83 सदस्यांचं संयुक्त कुटुंब एकत्र राहतं. या कुटुंबासाठी दररोज 50 किलो तांदूळ लागतो, तर रविवारी एक मेंढरू आणि 10 किलो चिकनची गरज असते. कुटुंबप्रमुख हनुमंथा रायडू आणि मुत्यालप्पा यांच्या नेतृत्वाखाली सर्व सदस्य शेती करतात. एकत्र राहिल्याने गरिबीतून बाहेर पडून त्यांनी 20 कोटींचं घर बांधलं.
83 सदस्यांचं संयुक्त कुटुंब; रोज 50 किलो तांदूळ, रविवारी एक मेंढरू
Source: BBC Marathi