हवामान बदल, अयोग्य जमीन व्यवस्थापन आणि मानवी हस्तक्षेपामुळे मातीचे आरोग्य खालावत आहे. सध्या बहुतांश जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.५ टक्क्यांपेक्षा कमी आहे, जे चिंताजनक आहे. सेंद्रिय कर्ब जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म सुधारतो. त्यामुळे सेंद्रिय खतांचा वापर, पीक अवशेषांचे व्यवस्थापन आणि जैविक पद्धतींचा अवलंब काळाची गरज बनली आहे.
मातीचा जिवंतपणा जपण्यासाठी सेंद्रिय कर्ब आवश्यक
Source: Agrowon