माजी मंत्री रामदास कदम यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावले यांच्या नियुक्तीचे स्वागत केले असून, सुनील तटकरे आणि अदिती तटकरे यांच्यावर टीका केली आहे. संख्याबळ असूनही पालकमंत्रीपद तटकरे यांना का मिळाले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तटकरे कुटुंबाच्या राजकीय प्रभावावर निशाणा साधत 'जादूटोणा' असल्याची खोचक टिप्पणीही केली.
रामदास कदम यांचा तटकरे कुटुंबावर टोला
Source: Pudhari