नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील वेहगी बारीपाडा या दुर्गम गावात रस्ता आणि पूल नसल्याने 23 वर्षीय रुसाबाई सुभाष वळवी यांचा उपचाराअभावी मृत्यू झाला. नातेवाईक त्यांना बांबू आणि चादरीच्या झोळीतून रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करून 100 मीटर पुलासाठी प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवल्याचे सांगितले.
रस्ता-पूल नसल्याने तरुणीचा मृत्यू
Source: BBC Marathi