महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या (बालभारती) इयत्ता सहावीच्या इतिहास व नागरिकशास्त्र पुस्तकातून वैदिक काळातील मांसाहार आणि वर्णव्यवस्थेतील सामाजिक विषमता यांसारखे संदर्भ वगळण्यात आले आहेत. अभ्यासक प्रा. श्रद्धा कुंभोजकर यांनी हे वास्तवाशी विसंगत असल्याचे म्हटले आहे, तर बालभारती प्रशासनाने बदलांचे समर्थन केले आहे.
बालभारतीच्या पुस्तकातून वैदिक संदर्भ वगळल्याने वाद
Source: BBC Marathi