मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील दुर्गम जंगलपट्ट्यात गोवर उद्रेकामुळे अनेक आदिवासी मुले दगावली. प्रशासनाला माहिती मिळायला आठवडे लागले. केंद्रीय पथकाने १२ ऑगस्टला भेट दिल्यानंतर सुमारे १२शे मुलांना लस दिली. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात नवीन रुग्ण आढळले नाहीत. मात्र, आरोग्य केंद्रे १५ किमी तर जिल्हा रुग्णालय १२० किमी दूर असल्याने उपचार विलंबाने मिळतात.
बालाघाटमधील गोवर उद्रेक: मेळघाटची पुनरावृत्ती?
Source: Max Maharashtra