काँग्रेसने पावसाळी अधिवेशनात १०, ११ आणि १२ ऑगस्ट रोजी सर्व खासदारांची उपस्थिती अनिवार्य करणारा व्हीप जारी केला आहे. एफसीआरए दुरुस्ती आणि परिसीमनासारख्या मुद्द्यांवर सरकारला घेरण्यासाठी विरोधकांची तयारी आहे. 'इंडिया आघाडी'तील मित्रपक्षांनाही १०० टक्के उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर पक्षाने संघटनात्मक पातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत.
काँग्रेसचा खासदारांना व्हीप; १०-१२ ऑगस्टला उपस्थिती बंधनकारक
Source: Lokshahi Marathi