केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने पश्चिम घाट इको-सेन्सिटिव्ह क्षेत्राच्या मसुद्यातून दोडामार्ग तालुका वगळल्याने वनशक्ती संस्थेने ती चूक सुधारण्याची मागणी केली आहे. संस्थेने पर्यावरण प्रधान सचिव जयश्री भोज यांना पत्र लिहून ६७ टक्के वनक्षेत्र असलेल्या या तालुक्याचा समावेश करण्याची विनंती केली आहे. रिअल इस्टेट माफियांमुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाल्याचेही नमूद केले आहे.
दोडामार्ग इको-सेन्सिटिव्ह क्षेत्रातून वगळल्याने वनशक्तीचा निषेध
Source: Sakal