अंबड तालुक्यातील जामखेडसह परिसरात पावसाने प्रदीर्घ उघडीप दिल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. कपाशीची पिके सुकू लागली असून सोयाबीन, तूर, मूग, मका यांनाही पाण्याअभावी संकट आले आहे. शेतकऱ्यांनी केलेला महागडा खर्च वसूल होणार नसल्याची चिंता व्यक्त केली आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.
अंबड तालुक्यात कपाशी पिके सुकली; खरिपावर दुष्काळाचे सावट
Source: Pudhari