राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात १२ व्या राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त येवला पैठणीच्या स्मरणार्थ विशेष टपाल तिकीट प्रकाशित करण्यात आले. यामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेल्या येवला पैठणीला राष्ट्रीय सन्मान मिळाला आहे. पैठणी उद्योगाशी हजारो विणकर, कारागीर आणि व्यापारी जोडलेले असून या सन्मानामुळे त्यांच्या कलेला नवी ओळख मिळण्याची अपेक्षा आहे.
येवला पैठणीच्या नावे राष्ट्रपतींच्या हस्ते टपाल तिकीट प्रकाशित
Source: Prahaar