महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय ५८ वरून ६० वर्षे करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. केंद्र आणि २५ राज्यांच्या धर्तीवर हा निर्णय घ्यावा, अशी भूमिका आहे. राज्यात सुमारे २.७५ लाख पदे रिक्त असून अनुभवी मनुष्यबळाचा उपयोग व्हावा, असे महासंघाचे म्हणणे आहे.
निवृत्ती वय ६० करण्याची मागणी; फडणवीसांकडे पत्र
Source: Sarkarnama